
Ranbir Kapoor । मागच्या काही दिवसापासून रणबीर कपूर सोशल मीडियावर कायम चर्चेत आहे. रणबीर कपूर याला थेट ईडी कडून समन्स पाठवण्यात आलाय. त्यामुळे रणबीर कपूर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रणबीरला 6 आॅक्टोबर रोजीच ईडीच्या कार्यालयामध्ये उपस्थित;k राहायचे होते. मात्र यावेळी त्याने मेल करत दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला. महादेव अँप प्रकरणात रणबीर कपूर याचे पाय खोलात असल्याचे अगोदरच स्पष्ट झाले आहे.
यामध्ये फक्त रणबीरच नाही तर बॉलीवूडचे अनेक कलाकार हे ईडीच्या निशाण्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. याप्रकरणी सर्वांची चौकशी देखील सुरू आहे. दरम्यान, रणबीर कपूरचा ऍनिमल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी तो चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र महादेव अँप प्रकरणाचा फटका देखील रणबीरच्या या चित्रपटाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतीच रणबीरने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांने मोठा खुलासा केला आहे.
Accident On Samriddhi Highway । समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! १२ जण जागीच ठार तर २२ जण जखमी
या मुलाखतीमध्ये रणबीर आलिया याच्याबद्दल बोलताना दिसला. रणबीर कपूर म्हणाला की, राहा हिच्यासाठी आलिया दररोज एक काम करत आहे. आलिया ही राहासाठी दररोज एक ईमेल करत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती बऱ्याच दिवसापासून हे करत आहे. त्यामुळे मी देखील विचार केला की मी हे करायला हवे. आता पुढच्या महिन्यात राहा ही एक वर्षाची होणार आहे. असं रणबीर म्हणाला आहे.