
Ahmednagar Kalyan Accident । मुंबई : सध्या अपघाताचे (Accident) प्रमाण वाढत चालले आहे. अनेक उपाय करूनही अपघात कमी होत नाहीत. अपघातामुळे एका क्षणात अनेक कुटुंबे उध्वस्त होतात. यातील अनेक अपघात हे वाहतुकीच्या नियमांचे (Traffic rules) उल्लंघन केल्याने होत आहेत. सध्या असाच एक भीषण अपघात झाला आहे. अपघातात भाजी विकण्यासाठी गेलेलं शेतकऱ्याचं संपूर्ण कुटुंब क्षणात संपलं आहे. (Latest Marathi News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजीपाला घेऊन ओतूरहून कल्याणकडे जाणारा पीकअप आणि कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा यांचा एक भीषण अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. डिंगोरे- पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर कल्याण हायवे (Ahmednagar Kalyan Highway) रोडजवळ असणाऱ्या पेट्रोलपंपासमोर ही दुर्दैवी घटना घडली आहे. (Accident News)
Salman Khan । चाहत्यांसाठी चिंतेची बातमी! सलमान खानच्या मेहुण्याच्या कारचा भीषण अपघात, नशेत…
मृतांमध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रिक्षा ओतूरकडे जाताना समोरुन येणाऱ्या पिकअपने या रिक्षाला जोरात धडक मारली.त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपघातातील पाच लोकांची ओळख पटली आहे तर उर्वरित तीन लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.