Site icon e लोकहित | Marathi News

“…अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल”; महाविकास आघाडीच्या महामोर्चात शरद पवार कडाडले

"…otherwise Maharashtra will burn"; Sharad Pawar was bitter in the grand march of Mahavikas Aghadi

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांबद्दल वक्तव्य करून चर्चेत येण्याचे सत्र सुरू असल्याच आहे. याकाळात भाजपच्या महत्त्वाच्या व मोठया नेत्यांनी चुकीची वक्तव्ये करत महापुरुषांचा अपमान केला आहे. दरम्यान राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला आहे.

धक्कदायक! रूग्णालयाच्या बाजूच्या इमारतीला आग लागून एकाचा मृत्यू

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagatsing Koshyari) महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलून टिंगलटवाळी करत आहेत. अशी टिंगलटवाळी करताना त्यांना लाज वाटली पाहिजे. अशा राज्यपालांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांची लवकरात लवकर हाकलपट्टी करा अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल. असा संतप्त इशारा देत शरद पवार यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

“उद्या कपडे न घालताच…”,दीपिकाच्या बिकीनीवर मुकेश खन्नांनी दिली प्रतिक्रिया

यावेळी शरद पवार यांनी 70 वर्षांपूर्वी झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षांबद्दल देखील सांगितले. तसेच आज महामोर्चा साठी जमा झालेली ही गर्दी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आली आहे. याचं कारण फक्त नि फक्त महाराष्ट्राचा सन्मान आहे. आज जे सत्तेत आहेत तेच महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करत आहेत. महाराष्ट्रात अनेक राजेराजवाडे व संस्थाने होऊन गेली पण साडे-तीनशे वर्ष होऊन देखील सामान्य माणसाच्या हृदयावर शिवाजी महाराजांचे ( Shivaji Maharaj) नाव आहे. त्यामुळे कुठल्याही मंत्र्याने शिवाजी महाराजांचा केलेला अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही. असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार? संजय राऊतांच मोठं विधान

Spread the love
Exit mobile version