
मुंबई : शिंदे- फडणवीस (Shinde- Fadnavis) सरकारने गोरगरिबांची दिवाळी (Diwali) जल्लोषात व्हावी म्हणून एक महत्वपूर्ण योजना आखली आहे. त्यानुसार, दारिद्रय़रेषेखालील सुमारे दीड कोटी कुटुंबांना अगदी कमी दरामध्ये रवा, साखर (sugar) , चणाडाळ आणि पामलेत इत्यादी वस्तू देणार आहेत. आता लवकरच या योजनेवर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली! कापूस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात होणार मोठी घट
मागच्या दोन वर्षांपासून कोरोना (Corona) संकट असल्याने जनतेला कोणताच सण आनंदात साजरा करता आला नाही. मात्र, यावर्षी सर्वच उत्सव मोठय़ा जल्लोषात साजरे करण्यास प्रोत्साहन देण्याचे धोरण सरकारने स्वीकारलंय. त्यामुळे आता श्रीमंत, मध्यमवर्गीयांबरोबरच गोरगरीब जनतेलाही दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करता यावा, यासाठी त्यांना मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.
सणासुदीच्या मुहूर्तावर ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फुल शेतीचं पावसामुळं नुकसान
दिवाळी जवळ आल्याने कमीत कमी कालावधीमध्ये नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी शनिवारी निविदा देखील मागविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लवकरच या योजनेवर निर्णय होईल. दिवाळी फराळाचे साहित्य पात्र कुटुंबांना मोफत द्यायचे की अल्पदरात, याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
ऑन ड्युटी रिल्स बनवने महिला कंडक्टरला पडले चांगलेच महागात; एसटी महामंडळाकडून निलंबन