Site icon e लोकहित | Marathi News

राज्य सरकारची नवी घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार कोटींची कर्जमाफी

New Announcement of State Government; Farmers will get loan waiver of crores

एका मागोमाग येणारी संकटांमुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. शेतीसाठी भांडवल देखील मोठ्या प्रमाणात लागते. आधीच पिकांचे झालेले नुकसान त्यात नवीन पिकासाठी लागणारे आर्थिक भांडवल यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ताण येतो. हा आर्थिक ताण कमी करण्यासाठी शेतकरी कर्जाचा पर्याय निवडतात. परंतु, सतत शेतीचे नुकसान होत राहिले तर शेतकऱ्यांना हे कर्ज ( Farmer’s Loan) देखील भागवता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच जातो. हा बोजा कमी करण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

फॉर्म १०A सबंधी आयकर विभागाचा आऊटरिच कार्यक्रम पार पडला!

शेतकऱ्यांचा कर्जाचा बोजा कमी व्हावा, यासाठी राज्यसरकारने ( state government) कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. आज ( 9 नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत सरकारने भू-विकास बँकेतील शेतकरी कर्जदारांची कर्जमाफी करण्याचे ठरविले आहे. यामुळे जवळपास 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. 964. 15 कोटी एवढ्या रुपयांची कर्जमाफी सरकार करणार असून यामध्ये 34,788 थकीत कर्जदारांचा समावेश आहे.

‘या’ यात्रेत विकला ५० लाखांचा बकरा; कारण ऐकुण व्हाल थक्क

एवढी मोठी कर्जमाफी झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. सध्या सोयाबीन व कापूस या पिकांना हवा तसा दर न मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नैसर्गिक संकटांमध्ये पिकांचे होणारे नुकसान आणि पिकांना न मिळालेला दर यामुळे शेतकऱ्यांची होणारी आर्थिक कोंडी या निर्णयाने थोड्याफार प्रमाणात दूर होईल.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उसाचे वजन आता मोफत करून मिळणार; ‘या’ नेत्याने घेतला मोठा निर्णय

Spread the love
Exit mobile version