Site icon e लोकहित | Marathi News

नाना पटोलेंची मनमानी, बाळासाहेब थोरतांचा राजीनामा आणि भाजपची काँग्रेस नेत्यांसाठी ऑफर, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Nana Patole's arbitrariness, Balasaheb Thorat's resignation and BJP's offer for Congress leaders, read what exactly is the case

नाशिक पदवीधर निवडणुकीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत. अशातच काँग्रेसचे वरीष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. थोरतांनी राजीनामा का दिला? यावरून सर्वत्र चर्चा सुरु आहे.

मोठी बातमी! आदिल खान दुर्रानीला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात, राखीने दाखल केली तक्रार

मागील 40 वर्षे बाळासाहेब थोरात संगमनेर मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला लढवत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी महसूलमंत्री आणि विधिमंडळातील सर्वात वरिष्ठ सदस्य म्हणून थोरातांची ओळख आहे. परंतु, वरीष्ठ नेते असून देखील आपला मान राखला जात नाही. असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे.

‘आय एम सॉरी…लव्ह यू मम्मी’ म्हणत बारावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वाद उघड्यावर पडले आहेत. पक्षाच्या विरोधात काम केल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. इतक्यावरच न थांबता नगरमधील ज्या काँग्रेस अधिकाऱ्यांनी तांबेना मदत केली. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली.

चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये वंचितची उडी; बंडखोर राहुल कलाटे यांना आंबेडकरांचा पाठिंबा? चर्चांना उधाण

खरंतर तांबे कुटुंब आणि थोरात कुटुंब यांचे जवळचे संबंध आहेत. मात्र पक्षाचे वरिष्ठ नेते असून देखील या कारवाईबाबत थोरातांसोबत कुठलीही चर्चा केली गेली नाही. याआधी देखील पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून काँग्रेसचे नेते आणि नाना पटोले असा पक्षांतर्गत संघर्ष उभा राहिला होता. यापार्श्वभूमीवर 15 फेब्रुवारीला काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

ब्रेकिंग! आदिल खान गुन्हेगार? राखी सावंतने केला अत्यंत मोठा खुलासा; म्हणाली…

या सगळ्या गोंधळात आणखी एक महत्त्वाची घटना घडली आहे. “बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला असा राजीनामा द्यावा लागणं, हे दुर्दैव आहे. जर काँग्रेसचे कोणी नेते भाजपमध्ये येऊ पाहत असतील तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. त्यांना आम्ही मानसन्मान देऊ. ” अशी खुली ऑफर भाजपने द्यायला सुरुवात केली आहे.

“स्वतःला पद, पैसा, सत्ता मिळणार असेल तर…”, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे जितेंद्र आव्हाडांवर टीकास्र!

Spread the love
Exit mobile version