नाना पटोलेंनी वीजबिल माफीवरून फडणवीसांना धरले धारेवर; म्हणाले “त्यांना आपल्याच मागणीचा विसर..”

Nana Patole held Fadnavis on edge over power bill waiver; Said "They forget their own demand.."

वीजबिल माफी वरून नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी वीजबिल माफ करण्यावरून सुनावले होते. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले (Nana Patole) यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

धक्कदायक! फिरायला नेतो सांगून वडिलांनीच जुळ्या मुलांना पाजले विष

यावेळी ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मध्य प्रदेश सरकारची उदाहरणे दिली होती. ही उदाहरणे देऊन त्यांनी वीजबिल (Electricity Bill) मा‌फ करण्याची मागणी केली होती. मात्र आता ते स्वत:च अर्थमंत्री आहेत. परंतु, त्यांना वीजबिल माफीच्या मागणीचा विसर पडलेला आहे.”

उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत; म्हणाली, मला शाहरुखची दुसरी पत्नी बनवा

फडणवीस विरोधी पक्षनेते होते तेव्हा मध्य प्रदेश सरकारचे गुणगाण करीत होते. मध्य प्रदेश सरकारने आता शेकडो शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले आहे. तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही? असे सवाल नाना पटोले विचारत होते. मात्र आता ते अर्थमंत्री असताना त्यांना सर्व गोष्टींचा विसर पडला आहे. सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले आहेत, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही”, असे म्हणत नाना पटोले यांनी टीका केली आहे.

बिग ब्रेकिंग! भारतीय सैन्याच्या ३ विमानांचा अपघात

दरम्यान पटोले यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत देखील वक्तव्य केले आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नसून त्यांच्यासाठी नियमित वीजपुरवठा केला जात नाही. तसेच त्यांना पीक विमा मिळत नाही. म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत. असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

“रस्ते चांगले करा, नाहीतर ठेकेदारालाच बुलडोझर खाली टाकू” – नितीन गडकरी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *