Site icon e लोकहित | Marathi News

Lakhimpur: लखीमपूर खेरीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना, न्याय मिळवून देण्याची भाजपाची प्रतिक्रिया तर विरोधकांचा योगींवर हल्लाबोल

Lakhimpur Kheri incident casts a shadow on humanity, BJP's reaction to get justice, while opponents attack Yogis

दिल्ली : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लखीमपूर खेरी येथील निघासन ठाणे क्षेत्रातील एका गावात दोन सख्या बहिणींवर (Two sisters) बलात्कार करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणानंतर उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण ढवळले आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. बलात्कार (rape) झालेल्या बहिणींमध्ये एका बहिणीचे वय १५ वर्ष तर दुसरी बहीण १७ वर्षांची होती. हत्या (murder) केल्यानंतर या दोन्ही बहिणींचे मृतदेह (dead body) झाडावर लटकवण्यात आले होते.

Aurangabad: “गावात फोर व्हिलर आणा व 51 हजार रुपये बक्षीस मिळवा”, औरंगाबाद जिल्ह्यात गावकऱ्यांची अजब ऑफर

दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी छोटू, जुनेद, सोहेल, हफिजुल रहेमान, करीमुद्दीन आणि आरीफ या सहा आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे. पोलिसांशी झालेल्या चकमकीत जुनेद जखमी झाला. या सहा आरोपींमध्ये पाचजण मुस्लिम तर एकजण हिंदू आहे.लखीमपूरचे पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी सांगितले की , या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान पीडित बहिणींच्या कुटुंबीयांनी सर्व आरोपींना फाशी, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि भरपाई अशी मागणी केली आहे.

घटना अशी घडली की, जुनेद आणि सोहेल यांचे दोन्ही बहिणींशी प्रेमसंबंध होते. दरम्यान या दोघी बहिणी वारंवार जुनेद आणि सोहेलकडे लग्नाची मागणी करत होत्या. दरम्यान या मागणीला कंटाळून जुनेद आणि सोहेल यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने या दोन बहिणींचा काटा काढायचे ठरवले. आपल्या साथीदारांच्या मदतीने त्यांनी दोन्ही बहिणींना घरातून खेचत बाहेर आणले. दरम्यान यावेळी मुलींच्या आईलाही बेदम मारहाण केली. उसाच्या शेतात घेऊन जाऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर दोघींची हत्या करून मृतदेह झाडाला टांगून ठेवले. तसेच या घटनेनंतर अखिलेश यादव, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मायावती यांनी उत्तरप्रदेश सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आता ‘या’ रेशनकार्ड धारकांवर केंद्र सरकार करणार कारवाई, वाचा नवीन नियम

राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेसचे नेता राहुल गांधी यांनी या घटनेवरून योगी सरकारवर हललाबोल केला आहे. ट्वीट करत राहुल गांधी म्हणाले की, “लखीमपूरमध्ये भर दिवसा दोन अल्पवयीन बहिणींचे अपहरण करून त्यांचा खून केला जातो, ही अतिशय संतापजनक घटना आहे.आपल्याला आपल्या बहिणी-मुलींसाठी देशात एक सुरक्षित वातावरण तयार करायला हवे.बलात्कार करणाऱ्यांना मुक्त करून त्यांचा सन्मान करणाऱ्यांकडून महिलांच्या सुरक्षेची अपेक्षा केली जाऊ शकत नाही.”

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर, असा असेल दौरा

प्रियंका गांधींची प्रतिक्रिया

लखीमपूर खेरी घटनेचा निषेध करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, “लखीमपूरमध्ये घडलेली दोन बहिणींच्या हत्येची घटना हृदयद्रावक आहे. त्या मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. वृत्तपत्र आणि टीव्हीवर रोज खोट्या जाहिराती दिल्याने कायदा व सुव्यवस्था चांगली होत नाही. यूपीमध्ये महिलांवरील गंभीर गुन्हे का वाढत आहेत? या योगी सरकारला कधी जाग येणार?”.

मायावती यांचा योगींवर हल्लाबोल

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती ट्विट करत म्हणाल्या की, “लखीमपूर खेरीमध्ये आईसमोरच दोन दलित बहिणींचे अपहरण केले गेले.तसेच त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचे मृतदेह झाडाला लटकावले गेले. अशा दुःखद आणि लज्जास्पद घटनांची जितकी निंदा करावी तितकी कमी आहे. या घटनेने यूपीमधील कायदा आणि सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकारचे दावे उघड झाले आहेत.”

Rain: मुंबईसह रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

अखिलेश यादव नेमक काय म्हणाले

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव लखीमपूर खेरी घटनेवर प्रतिक्रीया देत म्हणाले की, ‘योगी सरकारमध्ये गुन्हेगार दररोज महिलांना त्रास देत आहेत. ही गोष्ट खूपच लज्जास्पद आहे. सरकारने या घटनेची योग्य चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करावी. लखीमपूरमधील शेतकऱ्यांनंतर आता दलितांच्या हत्या ही ‘हाथरस की बेटी’ हत्याकांडाची घृणास्पद पुनरावृत्ती आहे.’

कॅबिनेट मंत्री जितिन प्रसाद यांची प्रतिक्रिया

लखीमपूर खेरी घटनेवर उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री जितिन प्रसाद म्हणाले की, ‘लखीमपूरची घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. दोन निष्पाप मुलींसोबत जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे. आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस कडक कारवाई करत असून, या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याला सोडले जाणार नाही. अशा घटना घडू नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील असून सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे आहे.

पीडित कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर

लखीमपूर खेरीत घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून मृत मुलींच्या कुटुंबासाठी पक्के घर तयार करून देणार आहेत. तसेच पिडीत कुटुंबाची शेतजमीन भाडेतत्त्वावर देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. दरम्यान या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात तपास होणार असून या दोषींना महिन्याभराच्या आतच शिक्षा झाली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.

Sairat: सैराट फेम प्रिन्सला अटक होण्याची शक्यता; जाणून घ्या नेमकं प्रकरण?

Spread the love
Exit mobile version