
मुंबई : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या विदर्भ दौऱ्यावर निघाले आहेत. यावेळी मुंबई ते नागपूरचा ( Mumbai to Nagpur) प्रवास त्यांनी रेल्वेने केला आणि ते नागपूरमध्ये पोहचले आहेत. राज ठाकरे या दौऱ्यात ते नागपूर, चंद्रपूर, अमरावतीतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन सविस्तर चर्चा करतील. त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या पाश्वभूमीवर ही बैठक होणार असून हा दौरा देखील त्यासाठीच आहे. आता राज ठाकरे यांच्या या विदर्भ दौऱ्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंच्या दौऱ्यावर जयंत पाटलांनी त्यांचं मत मांडल आहे. राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष वाढवावा. त्यांनी दुसऱ्या पक्षासाठी काम करु नये, असं म्हणत जयंत पाटलांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय. दरम्यान, राज ठाकरेंचा विदर्भ (Vidarbha) दौरा पाच दिवसांचा म्हणजेच २२ सप्टेंबर पर्यंत असणार आहे. यावेळी राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडतील हे पाहून महत्वाचं असून राज ठाकरे यावेळी नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये दौरा करणार आहेत.
सशस्त्रक्रिया झाल्यानंतर हा त्यांचा पहिला दौरा –
मागच्या काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर सशस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी सांगण्यात आले होते. पण, सशस्त्रक्रियानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा असणार आहे. मनसेची ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरेंचा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जात आहे.
Aryan Khan: आर्यन खानच्या प्रेमात पडली ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट