श्रीगोंदा तहसिलसमोर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जागरण गोंधळ

Jagran gondhal to solve the questions of farmers in front of Shrigonda tehsil

श्रीगोंदा: तहसील कार्यालय येथे सरकार व निष्क्रिय राज्यकर्ते, कारखानदार तसेच तालुक्यातील अतिशहाणे निष्क्रिय मुजोर अधिकारी यांचे डोके ठिकाण्यावर आणून, त्यांना देवा खंडेरायाने योग्य सद्बुद्धी द्यावी व झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यात आला.

आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

शेतीपंपाची सक्तीची वीज बिल वसुली बंद करावी. ओल्या दुष्काळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये मदत मिळावी. श्रीगोंदा तालुक्यातील चारही साखर कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता किमान ३१०० रुपये द्यावा.

‘या’ डेअरीमुळे महाराष्ट्रातील दुधाला सर्वाधिक दर

त्याचबरोबर पंचायत समिती कार्यालयात गायगोठा अनुदानासाठी शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यावी. लंपी आजाराने दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळावी. जनावरांचे सर्व आठवडे बाजार सुरू करण्यात यावे. या सर्व मागण्यासाठी हे अनोखे आंदोलन तहसील कार्यालयासमोर करण्यात आले.

वीजबिल भरण्याबाबत राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *