Site icon e लोकहित | Marathi News

शेतकऱ्यांना लग्नासाठी मुलगी मिळणे मुश्किल; केंद्रीय मूल्य आयोगाच्या बैठकीत शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

It is difficult for farmers to get a daughter for marriage; Farmers raised their grievances in the Central Value Commission meeting

केंद्रीय मूल्य आयोग ( CACP) सध्या राज्यांच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना आपली कैफियत मांडली आहे. शेतीत प्रचंड कष्ट करून सुद्धा नफा होत नाही. त्यामुळे शेती करणारी शेतकरी कुटुंब कायम संकटात असतात. त्यांची प्रगती तर होतच नाही ; मात्र तोट्यातील शेतीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नही जमत नाही. अशी तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.

साखरपुडा अनंत अंबानीचा मात्र चर्चा ऐश्वर्या राय बच्चनच्या लेकीची

पुणे येथील साखर संकुलामध्ये शुक्रवारी (ता. २०) केंद्रीय कृषी खर्च आणि मूल्य आयोगाने पश्चिम राज्यांची एकत्रित बैठक घेतली. दरम्यान काही शेतकरी प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. इतरवेळी आयोगाच्या बैठकीत मुद्द्याला सोडून कोणी बोलत असेल तर त्यांना हटकले जाते. पण यावेळी तीन शेतकऱ्यांनी आपल्या भाषणात लग्नाचा मुद्दा मांडला.

राज्यसेवा मुख्यपरीक्षेत धक्कादायक प्रकार! परीक्षेवेळी ब्लूटूथचा वापर करणाऱ्या उमेदवारावर गुन्हा दाखल

यावर आयोगाने आक्षेप न घेता शेतकऱ्यांचे भावनिक प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आयोगासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सर्व मुद्दे मांडण्याची मोकळीक दिली. ‘‘साहेब, तोट्यातील शेतीमुळे शेतकरी मुश्किलीत जगत आहेत. त्यामुळे शेतकरी व शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यावी लागेल.

हौसेला मोल नाही, मुलाच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबाने उधळले लाखो रुपये

शेतीत ( Farming) प्रगती होत नाही म्हणून ग्रामीण भागातील तरुण मजूर होण्यास तयार आहेत, मात्र शेतकरी होण्यास कोणीही तयार नाही. दरम्यान त्यांना लग्नासाठी मुलगी देण्यास आता कोणी पुढे येत नाही,’’ असा मुद्दा एका शेतकऱ्याने यावेळी मांडला आहे.

शिवजयंतीपूर्वी हे सरकार कोसळणार – अमोल मिटकरी

Spread the love
Exit mobile version