Site icon e लोकहित | Marathi News

CWG 2022 : भारताने बार्बाडोसचा 100 धावांनी पराभव करत गाठली उपांत्य फेरी

India defeated Barbados by 100 runs to reach the semifinals

मुंबई : जेमिमाह रॉड्रिग्जचे नाबाद अर्धशतक आणि शफाली वर्माच्या आक्रमक ४३ धावांच्या जोरावर भारताने (IND vs BAR) बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जिंकली. रेणुका सिंग ठाकूरच्या चार विकेट्सच्या जोरावर त्यांनी महिलांच्या T20 मध्ये बुधवारी बार्बाडोसचा 100 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाठवलेल्या भारतीय संघाने चार विकेट गमावत 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात बार्बाडोस संघाला आठ विकेट्सवर केवळ 62 धावा करता आल्या.

बार्बाडोसकडून किशोना नाइटने सर्वाधिक 16 धावा केल्या. भारतातर्फे रेणुका सिंह ठाकूरने चार षटकांत 10 धावा देत चार बळी घेतले. तत्पूर्वी, भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि दुसऱ्याच षटकात स्मृती मानधना हिची विकेट गेली. त्यावेळी केवळ पाच धावा धावफलकावर होत्या.

यानंतर जेमिमा आणि शेफाली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. विशेषतः आक्रमक खेळी खेळताना शेफालीने २६ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. ती धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतली.

Spread the love
Exit mobile version