Site icon e लोकहित | Marathi News

India vs Pakistan : भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला: स्मृती मंधानाने 63 धावांची धडाकेबाज खेळी खेळली

India beat Pakistan by 8 wickets: Smriti Mandhana plays a brilliant knock of 63

मुंबई : भारताने करो किंवा मरोच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध आपला दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तान ने प्रथम नानेफेक जिंकत फलंदाजी केली. भारताने लक्षाचा पाठलाग करताना राष्ट्रकुल स्पर्धेत पहिला विजय मिळवला आहे. त्यांनी गट फेरीतील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने रविवारी महिला टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 18 षटकांत केवळ 99 धावा करू शकला. त्याचवेळी पाक संघाचे 3 फलंदाज धावबाद झाले. भारताकडून स्नेहाराणा आणि राधा यादव यांनी सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या.

शेफाली वर्मा नऊ चेंडूत 16 धावा करून बाद झाली. तुबा हसनच्या चेंडूवर मुनिबा अलीने त्याचा झेल घेतला. शेफालीने स्मृती मनधनासोबत पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. ती बाद झाल्यानंतर एस मेघना फलंदाजीला आली.आणि आपला विजय मिळवला

प्रत्युत्तरात भारतीय संघाने 11.4 षटकांत केवळ 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. स्मृती मंधानाने धमाकेदार फलंदाजी करताना अवघ्या 42 चेंडूत 63 धावा केल्या. तिच्या फळीने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद दोन धावा केल्या आणि भारताने दणदणीत विजय मिळवला.

Spread the love
Exit mobile version