
सगळीकडे होळीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. देशाच्या विविध भागामध्ये होळी वेगेवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. रंगांची उधळण करत होळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. तर काही गावामध्ये काही वेगळ्या पद्धती असतात त्यामुळे त्या गावात वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. होळी साजरी करताना काही गावांमध्ये अंधश्रद्धांचा वापर केला जातो.
देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “…पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात”
सध्या राजस्थानच्या बासवाड गावाची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. या गावामध्ये होळीच्या दिवशी दोन मुलांचे परस्परांशी लग्न लावले जात असते. आणि संपूर्ण गाव या अनोख्या लग्न सोहळ्याला उपस्थित असते. या गावामध्ये दोन मुलांचे लग्न परस्परांशी लावण्याची आगळीवेगळी प्रथा दरवर्षी पाळली जाते. खूप आधीपासून चालत आलेली ही प्रथा आहे.
चर्चा तर होणारच! हौशी बापाने मुलाच्या वाढदिवसानिमित्त वेरना कारचा केक बनवला; केकचे वजन तब्बल…
यामध्ये नवरा आणि नवरी दोन्हीही कमी वयातील मुलांना निवडून बनविले जाते. यांची निवड करताना ज्यामुलाचे जानवे परिधान केल्याचे संस्कार झालेले नाहीत फक्त अशाच मुलाची या लग्नासाठी निवड केली जाते. या लग्नाला येथील लोक ‘गेरिया’ असे म्हणतात. सध्या या आगळ्यावेगळ्या प्रथेची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे लवकरात लवकर पंचनामे करा; एकनाथ शिंदे यांचे निर्देश