Site icon e लोकहित | Marathi News

Anjali Damania : संजय राठोड सारख्या माणसाला मंत्रिपद कसं देऊ शकतात? अंजली दमानियांची जोरदार टीका

How can a man like Sanjay Rathod be given a ministerial post? Strong criticism of Anjali Damania

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) आज त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवनर या ठिकाणी पार पडला आहे. शिंदे गटातून नऊजण आणि भाजपातून नऊजण असे एकूण १८ मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाच्या संजय राठोड (Sanjay Rathod) यांनीही शपथ घेतली. या शपथविधीनंतर अंजली दमानिया यांनी संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत लिहिले की, “दोन नावं बघून खूप वाईट वाटलं. संजय राठोड? अशा माणसाला मंत्रिपद कसं देऊ शकतात? अब्दुल सत्तार? यांना मंत्रिपद द्यायची इतकी घाई का? घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती. परत ये रे माझ्या मागल्या सुरू. एका माळेचे मणी”. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे.

चित्र वाघांनीही केली होती टीका –

“पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे” असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

Spread the love
Exit mobile version