
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन(mansoon session) बुधवार 17 ऑगस्टपासून सुरू झाले होते.दरम्यान अधिवेशनाच्या शेवटच्या आणि पाचव्या दिवशी म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राढा झाला.याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातील अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी विरोधकांवर म्हणजेच अमोल मिटकरींना (amol mitkari)लक्ष्य करत निशाणा साधला आहे.
“बैल पोळा” कृषीप्रधान देशाचा कृषी पुरक सन
काय म्हणाले बच्चू कडू
“मला तर वाटतं की काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत आणि पायरीवर येऊन जोरजोरात बोंबलतात. पायऱ्यांवर कुणी बोललं आणि बॅनर छापले की त्याची ब्रेकिंग होते”. “तुम्ही ५० खोके, एकदम ओके वगैरे घोषणा त्यांनी केल्या.जर तुम्हाला ५० खोके दिले असं वाटत असेल, तर कारवाई करा. असं नामर्दांसारखं वक्तव्य का करत आहात? मर्दानगी असेल, तर समोर या आणि पुरावे द्या”, असे आव्हान बच्चू कडूंनी विरोधकांना दिले आहे.
Uddhav Thakarey: काय सांगता, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार? वाचा सविस्तर..
विधानभवनात राढा का झाला
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी खोके आणि ओक्केवरून दोन्ही बाजूचे दोन आमदार हमरीतुमरीवर आले आणि प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले.विरोधकांकडून पन्नास खोके, एकदम ओके… खाऊन ५० खोके, माजलेत बोके… गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी… अशा घोषणांमध्ये रोजच्या रोज नवनव्या घोषणांची भर पडत होती.
Jammu kashmir: उरी सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 दहशतवाद्यांना कंठस्नान
पुढे सत्ताधाऱ्यांनी आघाडी सरकारला लक्ष्य करत लवासाचे खोके, बारामती ओके… वाझेचे खोके, मातोश्री ओके… अशा घोषणा शिंदे गटाच्या आमदारांनी दिल्या. घोषणा सुरू असतानाच विरोधी पक्षाचे आमदार तिथं आले. तसा शिंदे गटाच्या आमदारांचा आवाज वाढत गेला. विरोधकांनीही त्यांना उत्तर दिले. त्यामुळं गोंधळ निर्माण झाला. त्याचवेळी शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आमनेसामने आले.