
मुंबई : शिंदे गटाने बंडखोरी करून भाजपशी (bjp) युती केली आणि सत्ता स्थापन केली. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर
एकमेकांवर आरोप (Accusation) करत आहेत. दरम्यान नुकत्याच वादात असलेल्या वेदांता प्रकरणावरून तर राजयकीय वातावरणात आगीचे भडके उठत आहेत. अशातच भाजप पक्षाचे नेते नारायण राणे (Narayana rane) यांनी काल प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (shivsena) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aadity Thakreay) यांच्यावर हल्ला केला आहे.
जनावरांना ‘हे’ तीन प्रकारचे गवत द्या, दूध वाढीसाठी होईल मदत
यावेळी त्यांना आदित्य ठाकरेंविषयी प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, “आदित्य ठाकरेंबद्दल आम्ही अधिकचे बोलणार नाही. कारण हातून सत्ता गेल्यापासून ते सैरभैर झालेले आहेत. आदित्य ठाकरे यांनी आता राजीनामा दिला तरी काय फरक पडणार आहे. कारण ते सत्तेत असून काही फरक पडला नाही. आता विरोधात असल्याने त्यांनी तर रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे.”असं म्हणत नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंवर घणाघात केला आहे.
No Homework: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! गृहपाठ बंद करण्याचा शिंदे सरकारचा विचार
पुढे बोलताना राणे म्हणाले की, “शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने 2019 च्या निवडणुकीत एकत्र निवडणुक लढताना उद्धव ठाकरे यांनी भाजपशी गद्दारी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. आणि मुळात खरी गद्दारी उद्धव ठाकरेंच केली.” अस म्हणत नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.