
आजकाल माणसाचे आयुष्य खूप कमी झाले आहे. कधी कोणता आजार होईल सांगता येत नाही! त्यात वैद्यकीय सोयीसुविधांचा खर्च देखील वाढला आहे. यामुळे सामान्य लोकांना कित्येक आजारांवर उपचार घेणे परवडत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक नवीन योजना आणली आहे. ( New Scheme of central government) या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना सरकार ५ लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार देणार आहे.
Viral : सार्वजनिक ठिकाणी तरुणीला रिल्स बनविणे पडले महागात पोलीस महिला आली अन् तरुणीला…” पाहा Video
विविध आजारांवर उपचार घेत असणाऱ्या लोकांना केंद्र सरकार आता आयुष्मान कार्ड ( Aayushman Card) देणार आहे. या मदतीने सामान्य लोकांना आजरांवर सहज उपचार घेणे शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी व निमसरकारी रूग्णालयांसाठी आयुष्मान कार्ड बनवणे सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.
यासाठी केंद्रसरकारच्या mera.pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. यानंतर मोबाईल नंबर टाकून कॅप्चा भरा. येथे OTP पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP मिळेल. तो OTP भरल्यानंतर तुमचे राज्य निवडून सर्व माहिती भरा. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही याबाबत माहिती मिळेल. यानंतर जवळच्या CAC केंद्रात जाऊन तुम्ही आयुष्मान कार्ड साठी अर्ज करू शकता.
Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी देवाकडे साकडे; जावईबापूंसाठी सासरवाडीत विधीवत पूजा