
सध्या कापसाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव वाढतील यामुळे काही शेतकऱ्यांनी तर कापसाची साठवणूक करून ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.
धक्कदायक! फिरायला नेतो सांगून वडिलांनीच जुळ्या मुलांना पाजले विष
आता याच पार्शवभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कापसाच्या दरासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना एक पात्र लिहिलंय. कापसाला प्रति क्विंटल १० हजार रुपयांचा दर द्या अशी मागणी अनिल देखमुख यांनी केली आहे.
शासनाने सध्या प्रति क्विंटल 6 हजार 380 असा दर निश्चित केला आहे. मात्र हा दर खूप कमी असून शेतकऱ्यांना परवडत नाही असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली MSP परवडत नाही. शेतकऱ्यांचा खर्च देखील यामधून निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांना अनेक आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.
उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत; म्हणाली, मला शाहरुखची दुसरी पत्नी बनवा
त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात अशी मागणी अनिल देशमुख यांनी पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. दरम्यान, सध्या कापसाचे भाव खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकरी आगामी काळात कापसाचे भाव वाढतील या आशेवर आहेत.
नाना पटोलेंनी वीजबिल माफीवरून फडणवीसांना धरले धारेवर; म्हणाले “त्यांना आपल्याच मागणीचा विसर..”