Site icon e लोकहित | Marathi News

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ४ जण जागीच ठार

Fatal accident on Mumbai-Ahmedabad National Highway, 4 people died on the spot

अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत सतत कुठे ना कुठे अपघात घडतच आहेत. सध्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) कार आणि बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! भारतीय सलामीवीर मुरली विजयनं जाहीर केली निवृत्ती

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि लग्झरी बसची (Car and luxury buses) धडक होऊन भीषण अपघात झाला. कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

सुषमा अंधारे ‘स्टूलवाली बाई’! ‘या’ बड्या नेत्याने केली जोरदार टीका

गुजरातहुन (Gujrat) मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला आहे. भरधाव कारवरील चालकाच नियंत्रण सुटल्यानं विरुद्ध दिशेनं येणाऱ्या लक्झरी बसवर कार धडकून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला आहे. हा अपघात एवढा भयानक होता की, या अपघातामध्ये कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अदानी ग्रुपसाठी धक्कदायक बातमी, गौतम अदानी टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

Spread the love
Exit mobile version