Site icon e लोकहित | Marathi News

शेतकऱ्यांनी घेतली थेट जलसमाधी; नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

Farmers took direct water burial; Farmers' agitation to demand compensation

राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. परंतु, सरकारने या शेतकऱ्यांसाठी अजूनही कुठलाच निधी मंजूर केला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने करण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकतेच नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन केले आहे. यावेळी चक्क महिला शेतकरी सुद्धा धरणाच्या पाण्यात उतरल्या होत्या.

गौतमी पाटीलने अर्धवट का सोडलं शिक्षण? का ठेवले लावणी क्षेत्रात पाऊल? वाचा सविस्तर माहिती

जायकवाडी धरण भरल्यावर धरणाचे पाणी थेट शेतात घुसल्याने गंगापूर (Gangapur) परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यासाठी या शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. याबाबत यापरिसरतील जायकवाडी विभागाला पत्र व्यवहार केला होता. परंतु, तरी देखील जायकवाडी विभागाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.

राजू शेट्टी यांचा सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले,” शेतकऱ्यांकडून लुटलेला पैसा राजकारणासाठी…”

यावर्षी राज्यात भरपूर प्रमाणात पाऊस झाला. यामुळे जायकवाडी धरण 100 टक्के भरून धरणाच्या बॅकवॉटर ( Jaykwadi Backwater) मध्ये अधिक प्रमाणात पाणी साचले होते. हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. फक्त खरिपातच नाही तर रब्बी हंगामात ( Kharip And Rabbi Hangam) देखील शेतकऱ्यांना या पाण्याचा फटका बसतो. प्रशासनाला तक्रार करून व न्यायालयात याचिका दाखल करून सुद्धा या शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर तेजीत

Spread the love
Exit mobile version