Site icon e लोकहित | Marathi News

अहमदनगर जिल्ह्यात सुसाट्याचा वारा, तुरळक पाऊस; शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Fair Wind, Sporadic Rain in Ahmednagar District; Huge loss to farmers

अहमदनगर जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासून लोक उकाड्याने हैराण होते. दुपारपासून सुसाट्याचा वारा सुटला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते यांनतर दुपारी सुसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे.

धक्कादायक! मित्राचा वाढदिवस केला दणक्यात साजरा, अन् काढला काटा; होत ‘हे’ कारण

सुसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे. तसेच शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या फळबागांचे वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सध्या आंब्याच्या झाडाला आंबे असल्यामुळे आंब्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

मोठी बातमी! ओडिशातील अपघाताचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले खरे कारण; ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

वाऱ्यामुळे काही लोकांच्या घराचे पत्रे देखील उडून गेले आहेत. काहींच्या गुरांच्या गोठ्याचे देखील नुकसान झाले आहे. त्याचबरोबर तरुळक प्रमाणात पाऊस देखील झाला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाला आहे.

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का! सहा बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Spread the love
Exit mobile version