
आजच्या काळात सगळ्यांकडेच मोबाईल आहे. महत्वाची बाब म्हणजे प्रत्येकाचं सोशल मीडियावर (Social Media) अकाऊंट आहेच. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील भावना (feelings) सोशल मीडियावर व्यक्त करत आहे. काहीजण तर कामधाम सोडून फक्त समाज माध्यमावर टीका-टिप्पणी (Commentary) करतात. इतकंच नाही तर काही जण अत्यंत घृणास्पद आणि हिंसक पोस्ट (Violent Post) टाकत असतात. ही लोक वैयक्तिक टीका करताना मर्यादाही पाळत नाहीत.
उटसूट काहीही बोलत असतात. परंतु आता टीका-टिपण्णी करताना सावधान. कारण आता सोशल मीडियावर काहीबाही पोस्ट करणे तुम्हाला महागात पडू शकते. याच कारण म्हणजे सरकार आता समाज माध्यमावर कंटेंटबाबत नवीन नियम तयार करत आहे. सरकारने (government) आता सोशल मीडिया कंपन्यांवर जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी तयारी केली आहे. दरम्यान यासाठी माहिती तंत्रज्ञान (IT) नियमांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
तसेच शनिवारी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Minister of State Rajeev Chandrasekhar) यांनी याविषयीची माहिती दिली. महत्वाची बाब म्हणजे हे संशोधित नियम सोशल मीडिया कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करतील. तसेच या कंपन्यांना कंटेंटवर लक्ष्य ठेवावे लागणार आहे. सरकारने सुरू केलेल्या या नवीन नियमांमुळे, आता सोशल मीडियावर काहीबाही लिहिणाऱ्यांवर बंधन येतील. इतकंच नाही तर कधीकधी त्यांचे अकाऊंटही बंद होण्याची शक्यता आहे. तसेच चुकीची माहिती अथवा गैरकायदेशीर माहिती टाकणाऱ्यांवर आता कारवाई होणार असून सरकारने आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंटेंटविषयक तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
आता मोदी सरकार देशात राबवणार ‘एक देश, एक पोलिस वर्दी’ संकल्पना, कारण…
याबाबतीतील सुधारणा आयटी (IT) नियमात करण्यात आली आहे. तसेच यासाठी अपिलीय समिती गठीत करण्यात येणार असून त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. अपिलीय पॅनल हे तीन सदस्यांचे आहे. दरम्यान या सुधारीत नियमानुसार आता मेटा आणि ट्विटर या सारख्या सोशल मीडियाच्या नियमांची समिक्षा करण्यात येणार आहे. तसेच सरकारकडे नागरिकांनी केलेल्या लाखो तक्रारींची तपासणी करण्यात येणार असल्याचे मंत्री चंद्रशेखर यांनी सांगितले.
मोठी बातमी! दूध संघांची पुण्यात बैठक, दुधाचे दर वाढण्याची शक्यता
मंत्री चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया कंपन्यांवर जबाबदारी सुनिश्चित करण्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, आता सोशल मीडियावर कोणी काहीबाही लिहित असले तर आता सोशल मीडिया कंपन्यांना जबाबदारीपासून पळता येणार नाही. कुणी जर चुकीची माहिती पोस्ट किंवा निंदानालस्ती पोस्ट ,तसेच बदनामीकारक, हिंसक मजकूर टाकण्यात आला तर सोशल मीडिया कंपनीला 72 तासांमध्ये मजकूर हटवावा लागणार आहे. इतकंच नाही तर तसेच नवीन कायद्यानुसार मजकूर टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासंबंधीची तरतूद ही आहे.