
मुंबई : आज शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ (Eknath Shinde) शिंदेनी अनेक शिक्षकांशी सवांद साधला. कोरोना काळामध्ये शिक्षकांणी खूप महत्वपूर्ण कामगिरी केली याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुकही केले. यावेळी राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचीही मोठी घोषणा केली आहे. या धोरणानुसार राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचंही त्यांनी नमूद केलय.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यातील सर्व मुलांना समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासनाने केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नवीन शिक्षण धोरण हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. पाचवीपर्यंत दिलं जाणारं शिक्षण मातृभाषेत दिलं जाणार आहे. पूर्वप्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे.”
Salman Khan: सलमानने चक्क काचेचा भरलेला ग्लास ठेवला जीन्सच्या खिशात, व्हिडिओ झाला व्हायरल
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, “आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. गुगलसारखं तंत्रज्ञान एका क्लिकवर पाहिजे ती माहिती देते पण शिक्षकाची जागा कोणतंही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही.” त्याचबरोबर “नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षणावर सहा टक्के खर्च करण्याची तरतूद आहे.
Sanjay Raut: संजय राऊतांचा आर्थर रोड मुक्काम वाढला, पण न्यायालयाने दिली ‘ही’ परवानगी