रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हिरडगावमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान

Due to heavy rains in Hirdgaon during the night, the crops of the farmers were damaged

श्रीगोंदा: रात्री रात्रभर प्रचंड पाऊस झाला आहे त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव या गावातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर स्त्याच्या कडेला देखील पाण्याचे प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहतांना दिसत आहे.

मुसळधार पावसाने पुण्यात घातला राडा, पाण्यात अडकलेल्या 12 जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

शेतकऱ्यांची तोंडाशी आलेली पिके पाणयात बुडाली आहेत यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारने लवकरात लवकर या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना ह्रदयविकाराचा झटका, मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

काल रात्री गावात खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्याची पिके पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. कांदा, मका, कपाशी, यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

‘सैराट’मधील लंगड्या आणि सल्या दिसणार ‘या’ चित्रपाटाच्या मुख्य भूमिकेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *