
Devendr Fadanvis । मागच्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगला चर्चेत आहे. मराठा आरक्षणामुळे राज्याचे राजकीय वातावरण देखील तापल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मैदानात उतरले आहेत. दरम्यान मराठा आरक्षणावर अनेक नेत्यांनी आपले भाष्य केले आहे. यामध्ये काहींनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे तर काहींनी सहमती दर्शवल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)
Bjp । भाजपला मोठा धक्का बसणार? 3 आमदार काँग्रेमध्ये जाणार?
दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला असल्याचे मोठे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. स्वतःच्या नेते पदासाठी शरद पवारांनी दोन समाजाला झुंजवत ठेवल्याचे देखील फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
त्याचबरोबर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे काही प्रश्न नाहीत का? असं विधान सुप्रिया सुळे यांनी केल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. जर शरद पवार यांच्या मनात मराठा आरक्षणाविषयी असतं तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यांना कधीच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यांना फक्त दोन समाजाला झुंजवत ठेवायचे होतं. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.