
शेतीच्या व शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कायम प्रयत्नशील असते. यासाठी अनेक योजना देखील राबविण्यात येतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. नवीन वर्षात शेतकरी वर्ग मोदी सरकारच्या काही मोठ्या घोषणांच्या प्रतीक्षेत आहे.
केंद्र सरकार 2023 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय घेऊ शकते. २०१८ मध्ये शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरूर करण्यात आली आहे. आता या योजनेच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन करू शकतात.
उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं! शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या सहा हजार रुपये मिळतात. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार आगामी बजेटमध्ये पीएम किसान लाभार्थ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिली जाणारी रक्कम आता चार हप्त्यांमध्ये दिली जाऊ शकते.
महाराष्ट्रातील ‘या’ गावात शेतीला बांधच नाहीत; सगळीकडे रंगलीय जोरदार चर्चा