
Weather Update । मागील काही दिवसांपासून पावसाने राज्याच्या (Rain in Maharashtra) काही भागात पाठ फिरवली होती. पेरण्या खोळंबल्याने शेतकरीवर्ग चिंतेत होता. परंतु पुन्हा एकदा पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अशातच आता हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. (Latest Marathi News)
Cows Died । धक्कादायक! विषारी वैरण खाल्ल्याने ४ गाई दगावल्या
हवामान खात्याकडून रायगड, पुणे, पालघर आणि सातारा या जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट तर रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, ठाणे, नाशिक, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात तसेच मुंबईसह ठाण्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Rahul Gandhi | हा लढा भाजपच्या विचारसरणीविरुद्ध, राहुल गांधी यांचा भाजपवर निशाणा
त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा, नाहीतर मुसळधार पावसात अडकलाच म्हणून समजा. दरम्यान, आता राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने रखडलेल्या पेरण्या पूर्ववत होऊ शकतील.