
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवार 17 ऑगस्टपासून सुरू झाले असून आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सरकार आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाले. दरम्यान आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे.गेली चार दिवस विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. आजचा पाचवा दिवस थोडा वादळीच झाली आहे.
आज विधान भवन परिसरात आमदारांचा राढा झाला. कारण सत्ताधारी- विरोधकांमध्ये आज धक्काबुक्की झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.तसेच या वादात आमदार अमोर मिटकरी (Amol Mitkari) यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसत आहे.दरम्यान, मिटकरांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गटातील नेत्यांनी आई-बहिणींनीवरुन शिवीगाळ केली असल्याचा आरोप केला. दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यामुळे विधान भवना बाहेर आमदारांचा राढा झाला होता.
दरम्यान, अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत त्यांनी सुरू असलेला सत्ताधारी आणि विरोधकांमधला वाद थांबवला. सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा जिव्हारी लागल्या. महाराष्ट्रातील सर्व जनता पाहत आहे, १७ तारखेपासून अधिवेशन सुरू आहे, चार दिवस आम्ही पायऱ्यांवर बसून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. त्या घोषणा आज सत्ताधाऱ्यांन झोंबल्या आहेत. आमच्या मागणीकडे लक्ष न देता. ५० ओके ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे, असंही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.