Site icon e लोकहित | Marathi News

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंनी वेळेआधीच उरकला औरंगाबादचा कार्यक्रम, 15 मिनिटात दाखवली मराठवाड्याला ‘ही’ मोठी स्वप्न

Chief Minister Shinde announced Aurangabad program ahead of time, showed 'this' big dream to Marathwada in 15 minutes.

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) कालपासून औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज दौऱ्याचा दुसरा दिवस असून औरंगाबाद येथे मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाचा (Marathwada Liberation Day) कार्यक्रम पार पडला. या दिनानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण (flag hoisting) करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमाच्या वेळेत बदल केल्याने तिथे वाद निर्माण झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ 15 मिनिटांत औरंगाबाद येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपून पुढे हैदराबाद येथील कार्यक्रमाला गेल्याने विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

Narayan Rane On Aadity Thakrea: “अहो सत्ता गेल्यापासून आदित्य ठाकरे सैरभैर झालेत”, नारायण राणेंचा घणाघात

मराठवाड्याचा असा होणार विकास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी औरंगाबाद येथील पंधरा मिनिटांच्या कार्यक्रमात मराठावाड्याच्या विकासासाठी काही मोठी स्वप्न दाखवली आहेत. या विकासामध्ये वेरूळ मंदिरासाठी 136 कोटींची तरतुद करण्यात आली असून पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार याचीही घोषणा केली.

तसेच जायकवाडी कालवा दुरुस्ती करण्याबरोबरच मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प हाती घेणार असून जालना पाणीपुरवठा नूतनीकरण देखील करण्यात येणार असल्याचेही शिंदे म्हणाले. पुढे शिंदे म्हणाले की, नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देण्यात येणार आहे तसेच लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद करण्याबरोबरच मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता देण्यात येणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री शिंदेनी मराठवाड्याच्या विकासासाठी केल्या आहेत.

खुशखबर! आता शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ‘एवढ्या’ कोटींचे अनुदान

कार्यक्रम लवकर आटोपण्याचे हे आहे कारण?

औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला होता. या कार्यक्रमाची वेळ सकाळी 9 वाजताची होती पण मुख्यमंत्री शिंदेंनी ही वेळ अचानक बदलून सकाळी सात वाजताच ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर आता शिंगे गट आणि शिवसेनेमध्ये वादाला सुरूवात झाली आहे.

दातांचा पिवळेपणा दूर करायचाय? करा ‘हे’ घरगुती उपाय

औरंगाबादमधील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हैदराबादला रवाना झाले आहेत. हैदराबादमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांचा मिळून मुक्तिसंग्रामाचा एक संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित राहणार आहेत. म्हणून एकनाथ शिंदेंनी औरंगाबाद मधील कार्यक्रम वेळेआधीच उरकला.

Spread the love
Exit mobile version