
केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या भल्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. दरम्यान आता केंद्र सरकारने आगामी काळात येणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी एक मोबाइल अॅप लाँच केले आहे. ते अॅप म्हणजे ‘जलदूत अॅप. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने विकसित केलेल्या या ‘जलदूत ऍप’ (Jaldoot App) अॅपमुळे ग्राम रोजगार सहाय्यकांना पावसाळ्यापूर्वी आणि नंतर वर्षातून दोनदा निवडक विहिरींची पाणी (Well Water Level) पातळी मोजण्यास सक्षम करता येईल.
जलदूत ऍपचा वापर
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, जलदूत ऍपचा वापर गावातील दोन किंवा तीन निवडक विहिरींची पाणी पातळी मोजण्यासाठी देशभरात केला जाईल. त्यामुळे शेतीसाठी (Agriculture) लागणाऱ्या पाण्याचा अंदाज येणार आहे. इतकंच नाहीतर या ऍपद्वारे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर विहिरींची पाणीपातळी तपासली जाणार आहे. तसेच प्रत्येक गावात पुरेसे मोजमाप ठिकाणे निवडणे आवश्यक आहे. कारण ते त्या गावातील भूजल पातळीचे प्रतिनिधी असतील.
दररोज खजुराचे सेवन केल्याने शरीराला मिळतात ‘हे’ लाभदायक फायदे; वाचा सविस्तर
असा होईल जलदूत ऍपचा फायदा ?
पंचायतींना विहिरींच्या पाणी पातळीची अचूक माहिती आणि डेटा जलदूत ऍप देईल. या अचूक माहितीचा उपयोग पुढील कामांच्या चांगल्या नियोजनासाठी केला जाणार आहे. तसेच ऍपचा डेटा ग्रामपंचायत विकास योजना आणि महात्मा गांधी नरेगा योजनांमध्ये वापरला जाऊ शकतो. महत्वाचं म्हणजे हा डेटा विविध प्रकारच्या संशोधनासाठी आणि इतर कारणांसाठी देखील वापरला जाऊ शकतो.
Eknath Shinde: मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी
देशभरात भूजल पातळी झपाट्याने घसरतेय
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे 251 घन किलोमीटर भूजल काढले जात आहे, परंतु असे असूनही भूजल पुनर्भरणाची काळजी घेतली जात नाही आणि देशातील भूजल पातळी सतत खालावत आहे. दरम्यान देशातील अनेक भागांमध्ये भूजलाचे वेगाने शोषण होत आहे. त्यामुळे सरकारने ही बाब लक्षात घेऊन सरकारने जलदूत ऍप लाँच केले आहे.
खुशखबर! व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये ‘इतक्या’ रुपयांनी कपात