
आजकाल मोबाईल मुळे कोणाशीही, केव्हाही आणि कुठूनही संवाद साधने शक्य आहे. पण तंत्रज्ञान जितके प्रगत होते तितकी सावधानता पाळावी लागते. आजकाल मोबाईलच्या (Mobile) माध्यमातून फसवणुकीच्या (Fraud) )अनेक घटना घडत आहेत. अनेकदा बनावट कॉल करून आपल्याकडून माहिती घेतली जाते. काही काळानंतर याच माहितीचा गैरवापर करून फसवले जाते. या पार्श्वभूमीवर मोबाईलवरून होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Ajit Pawar: अजित पवारांच्या अडचणीत वाढ? शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी
इथून पुढे फोनवर Unkonwn नंबर वरून कॉल आल्यास नंबर नाही तर थेट फोन करणाऱ्याचे नावच दिसणार आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने हा निर्णय घेतला असून या निर्णयाने मोबाईलवरून होणाऱ्या फसवणुकीस चांगलाच आळा बसणार आहे. सिम कार्ड विकत घेताना फॉर्मवर ज्या व्यक्तीचे नाव असेल तेच नाव आता मोबाईल स्क्रीन वर दिसणार आहे. या संबंधीची माहिती नुकतीच दूरसंचार विभागाने दिली आहे.
आफताब बाप होणार होता?; तरीही केली श्रद्धाची हत्या
दूरसंचार विभागाच्या या निर्णयामुळे मोबाईल वापरकर्त्यांना आता unknown नंबर ओळखण्यासाठी, कुठल्याही अँप ची गरज भासणार नाही. याआधी यासाठी truecaller हे अँप मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते. या निर्णयाने केंद्र सरकारच्या इतिहासात आणखी एका मोठ्या व महत्त्वाच्या निर्णयाची वाढ झाली आहे.