
मुंबई | रत्नागिरी जिल्ह्यात नवा किल्ला आढळून आला आहे. यामुळे शिवप्रेमी आणि गडप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. कोकण (Konkan) भागातील, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली (Dapoli) आणि खेड तालुक्याच्या सीमेवरती रामगड नावाचा किल्ला आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! आमदार संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल होणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हा शोध दुर्ग अभ्यासक डॉ. संदीप परांजपे (Dr. Sandeep Paranjape) आणि पुरात्त्व अभ्यासक सचिन (Sachin Joshi) जोशी यांनी लावला आहे. यावेळी त्यांनी या किल्ल्याचा ऐतिहासिक संदर्भ देखील दिला आहे. वास्तुरचनेतील शास्त्रीय पुराव्यांवर आधारित रामगड हा अपरिचित दुर्ग असल्याचंही दुर्ग अभ्यासकांनी सांगितल आहे.
Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त ब्रॉडबँड इंटरनेट प्लॅन! जाणून घ्या याबद्दल…
अभ्यासकाच्यामते, किल्ल्याच्या सर्वेक्षणात रामगड किल्ल्याचा (Ramgarh Fort) दरवाजा, त्याचे दोन संरक्षत बुरुज, तटबंदीतील चार बुरुजांसह इमारतींचे अवशेष, काही थडगी, भांड्याचे तुकडे सापडले आहेत. किल्ल्याचे सॅटेलाइट फोटोही काढण्यात आले असून फोटोंमधून किल्ल्याच्या काही बांधकामाचे अवशेष आढळले आहेत.
बिग ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंसाठी शरद पवार उतरणार मैदानात
या शोधामुळं इतिहासातील आणखी पान उलगडली जाणार असल्याचं मत आहे. हा शोधण्यात आलेला रामगड किल्ला समुद्रसपाटीपासून 390 मीटर उंचीवर आहे. रामगड किल्ला पालगड किल्ल्याचा जोडकिल्ला आहे. या किल्ल्याची बांधणी केव्हा आणि कोणत्या काळात झाली याची माहिती उपलब्ध नसल्याचं अभ्यासकांनी सांगितलं आहे. अभ्यासकांकडून अधिक शोध सुरु आहे.