
अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांचं “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” हे नवीन गाणं रिलीज झालं होत. त्यामुळे त्या पंजाबी गाण्यामुळे अमृता फडणवीस चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.
Video: रणबीर कपूरने फेकून दिला चाहत्याचा फोन; संतापलेले नेटकरी म्हणाले हा कोणता माज?
आता प्रजासत्ताक दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित केलं. आगामी BHARATEEYANS या चित्रपटामधील अमृता फडणवीस यांनी गायलले गाणे प्रसिद्ध झाले आहे. अमृता फडणवीसांनी ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे गाण गायले आहे. अमृता फडणवीसांनी याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली. तसेच गाण्याचा व्हिडीओ देखील त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला. गाणं ऐकून नेटकरी त्यांच्यावर नाराज झाले आहेत.
कापसाला प्रतिक्विंटल १० हजार रुपयांचा दर द्या – अनिल देशमुख
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांचे गाणे रिलीज होताच काही वेळातच लाखो व्हयूज येतात. या नवीन गाण्यामुळे नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केले तर काहींनी त्यांना ट्रोल देखील केले आहे. मराठी माणसांवर हा अत्याचार आहे, भसाडा आवाज आणि अल्बम काढून कोणी स्टार होत नाही, हा देशाचा अपमान आहे अशा वेगेवेगळ्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
नाना पटोलेंनी वीजबिल माफीवरून फडणवीसांना धरले धारेवर; म्हणाले “त्यांना आपल्याच मागणीचा विसर..”