
मकरसंक्रांत झाली की उन्हाळ्याची (summer)चाहूल लागते. त्यामुळे ग्राहकांची बाजारात फळे (fruit) घेण्यासाठी देखील गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळते. मात्र, यंदा अजुनही थंडी गेलेली नाही. त्यामुळे या सर्व गोष्टाचा फटका कलिंगड शेतकर्यांना (Kalingad) बसला आहे. थंडी असल्यामुळे ग्राहक कलिंगड ( Watermelon) खरेदी करत नाहीत.
मोठी बातमी! पेट्रोल डिझेल प्रचंड स्वस्त होणार? निर्मला सितारमण यांचे संकेत
उन्हाळ्यात एपीएमसी फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांची मागणी अधिक असते, परंतु सध्या कडाक्याची थंडी पडली असल्याने रसाळ फळांची मागणी २० ते २५ टक्के कमी झाली आहे. यादरम्यान यंदा कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. कलिंगडचे दर प्रचंड (Watermelon Price) घसरले आहेत.
मोठी बातमी! राहुल कलाटे यांना वंचितचा पाठिंबा जाहीर
तळकोकण येथील शेतकऱ्यांना ठोक बाजारपेठेत ३ ते ५ रुपये किलो असा दर मिळत आहे. त्यामुळे वाढीव उत्पन्न तर सोडाच पण झालेला खर्चही पदरी पडणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. बाजारपेठेतील अस्थिरतेचा पुन्हा शेतीमालाच्या दरावर परिणाम झाला आहे. तर सिंधुदुर्गात शेकडो टन माल शेतात पडुन आहे. दर नसल्यामुळं बाजारात कलिंगड नेऊन काय करणार? असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे.
ब्रेकिंग! भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज पृथ्वी शॉ च्या गाडीवर हल्ला