
मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत इडी यांना अटक केल्यानंतर, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा भारतात फक्त भाजप राहणार असं वक्तव्य त्यांनी केले. आपण जर आपल्या विचारधारेवर चाललो तर आपण देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपवू शकतो, असे ते बिहारमध्ये भाजपाच्या १४ जिल्हा कार्यालयांच्या उद्घाटनाच्या वेळी बोलले. त्यातच शिवसेना संपत आलेला पक्ष आहे असेही ते बोलले.
पुढे ते म्हणाले, “देशात आपल्या विरुद्ध लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष शिल्लक नाही. आपली खरी लढाई ही कुटुंबवाद आणि घराणेशाही यांच्या विरोधात आहे”. भाजप हा विचारधारेवर चालणारा देशातला एकमेव पक्ष आहे असाही उल्लेख त्यांनी केला.
जस तमिळनाडूमध्ये घराणेशाही, शिवसेना संपत आलेला पक्ष तोही तसाच आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे देखील घराणेशाही आहे. काँग्रेस तर हा भाऊ बहिणीचा पक्ष झालाय. राष्ट्रीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल ,तेलंगणा राष्ट्र समिती असा अनेक पक्षांचा उल्लेख त्यांनी केला. “काँग्रेसने कितीही प्रशिक्षण केंद्रं घेतली तरी त्यांना फायदा होणार नाही. टिकण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज लागते. दोन दिवसात पक्षाचे संस्कार आत्मसात होत नाहीत,” असा टोला देखील जे पी नड्डा यांनी लगावला.