
सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकारणात अनेक ट्विस्ट आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या राजकीय वर्तुळात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्विटन खळबळ उडाली आहे. (A tweet by social activist Anjali Damania created a sensation)
कारखान्यावर छापा पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
अंजली दमानिया यांनी ट्विट करत लिहिले की, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच बघू…..” सध्या त्यांचे हे ट्विट खूप चर्चेत आहे. यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्येच आता यावर शरद पवारांनी देखील भाष्य केलं आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा
पत्रकारांनी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारले असता शरद पवार म्हणाले, ‘मला त्याबाबत काही माहिती नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.