
गोड पदार्थ खाणे लोकांना विशेष आवडत असते. त्यातल्या त्यात गुलाबजाम म्हंटल की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. गुलाबजाम हा बहूतेक लोकांच्या आवडीचा पदार्थ आहे. आजकाल बाजारात इंस्टंट गुलाबजाम चे पीठ सुद्धा उपलब्ध असते. यामुळे कधीही घरच्याघरी गुलाबजाम करता येतात. परंतु, एका शेतकरी गटाने चक्क सोयाबीन पासून गुलाबजाम ( Gulabjam from Soyabean) बनवण्याची शक्कल लढवली आहे.
7 वर्षे झाली पण बिर्याणीच भारतीयांची फेव्हरेट! स्विगीने केला मोठा खुलासा…
हिंगोली जिल्ह्यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या गटाने सोयाबीनपासून गुलाब जामून बनवले आहेत. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील कवडा, वारंगा मसाई, बेलमंडळ आणि सिंदगी या गावातल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे गुलाबजाम अस्सल तुपातले आहेत. फक्त इतकचं नाही तर या शेतकऱ्यांनी सोयाबीनपासून दूध, पनीर, खवा असे विविध पदार्थ देखील तयार केले आहेत.
चंद्रकांत पाटलांनी शाईफेकीचा धसका घेतला? सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना केला फेसशिल्डचा वापर!
पानी फाउंडेशनच्या ( Pani Foundation) फार्मर कप स्पर्धेसाठी या शेतकऱ्यांनी हे गुलाबजाम बनवले आहेत. याबाबत पानी फाऊंडेशनने पोस्ट केली आहे. या पोस्टवर अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया येत आहेत. फार्मर कप ( Farmer Cup) स्पर्धेत गटशेती व शेतमालाचे मूल्यवर्धन करणे या गोष्टींना महत्त्व व प्रोत्साहन दिले जाते. यामुळे कळमनुरी तालुक्यातील शेतकरी गटाने सोयाबीन पासून विविध खाद्यपदार्थ बनवून मूल्यवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे.
बारामती शहरात विद्यार्थी सुरक्षित आहेत का? वाढत्या गुन्हेगारीमुळे ‘एज्युकेशन हब’ ला गालबोट!