
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत असून बिहारमध्येही अशाच राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय जनता दल (युनायटेड ) हा नितीश कुमार यांचा पक्ष असून आणि राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal)हा लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) पक्ष आहे. आता हे दोन्हीही पक्ष पुन्हा एकदा नव्याने सत्तासमिकरण राबिवण्याच्या विचारात असून या दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांची स्वतंत्र बैठक घेतलेल्या आहेत. बिहारमधील राजकारणात सुद्धा सध्या उलथापालथ चालू आहे.
नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली असून ते राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. भाजपचे नीतीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात असणारे 16 मंत्री राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस, सीपीआयएमएल आणि जीतन राम माँझी यांनी नितीश कुमार यांना बिनशर्थ पाठिंबा देण्याची घोषणा नीतीश कुमार यांनी बोलावलेल्या पक्ष आमदारांच्या बैठकीच्या आधीच केलेली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दुरध्वनीवरुन मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. यावेळी बिहारमधील राजकीय स्थिती आणि एकूणच घटनाक्रमावर आक्रमक स्वरूपात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रतिक्रिया देण्याबात सूचना दिल्या आहेत हे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, नीतीश कुमार भाजपशी संबंध तोडून आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत नविन सरकार स्थापन करतील. अश्याच चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहेत. याचसोबत पटनामध्येच राहण्याचे आदेश आरजेडी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना दिलेले आहेत.