
ऊसतोड मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचे गाव सोडून दुसऱ्याच्या गावात येऊन दिवसरात्र काबाडकष्ट कष्ट करत असतात. पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत ते राबराबराबत असतात. या ऊसतोड मजुरांसोबत दिवसरात्र त्यांचे कुटुंब देखील कष्ट करत असते. ऊसतोड मजुरांची पत्नी त्याचबरोबर त्यांची लहान मूल देखील दिवसभर राबत असतात. यामध्ये काही महिला गरोदर असताना देखील उसाच्या फडात काम करत असतात.
बिग ब्रेकिंग! नरेंद्र मोदींच्या सभेआधी बीकेसीमधील कमान कोसळली
आता गरोदर असताना ज्या महिला उसाच्या फडात काम करत आहेत त्या महिलांबाबत थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र सरकारला नोटीस देखील पाठवली आहे. त्याचबरोबर पुढच्या एका महिन्यामध्ये याबाबतचा सविस्तर अहवाल देखील मागवण्यात आला आहे.
कठीण काळात मुकेश अंबानींनी केली मोठी मदत; राखी सावंतचा मोठा खुलासा
ऊसतोड मजुरी करणाऱ्या महिलांपैकी जवळपास दहा टक्के गर्भवती महिला आहेत, मात्र या महिलांना काही सरकारी योजना आणि त्यांचे कायदेशीर हक्क याबाबत काहीही माहिती नसल्याची माहिती समोर आलं आहे. याचपार्शवभूमीवर सरकारला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं नोटीस देखील पाठवली आहे.
“पी दारू..खा गुटखा…”; आरोग्य शिबिराच्या उद्घाटनावेळी अजित पवारांचा मोठा सल्ला!
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. यामध्ये जवळपास १५२ गरोदर ऊसतोड महिला मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. या गरोदर महिलांचे श्रीगोंदा तहसील अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत सर्व्हेक्षण केले जाते. नंतर त्यानं त्यांच्या मूलभूत हक्क आणि आरोग्याबाबत जागरूक केलं जातं यासाठी आरोग्य सेविकांची देखील मदत घेतली जाते.