
मुंबई : पी.व्ही.सिंधूने (PV Sindhu) भारताचे दोन ऑलिम्पिक पदकजिंकली आहेत. आगामी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधू भाग घेणार असल्याची माहिती समोर आली होती. पण, पी.व्ही.सिंधूने तिच्या डाव्या पायाला दुखापत असल्यामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. पी. व्ही. सिंधूने ट्विटरच्या माध्यमातून शनिवारी ही माहिती दिली आहे.
सिंधूने २०१९मध्ये जागतिक स्पर्धा जिंकून एक नवा विक्रम केला होता. त्याचबरोबर तिने या स्पर्धेत दोन वेळा रौप्यपदक आणि दोनदा कांस्यपदक देखील पटकावले आहे. सिंधूने बर्मिगहॅम या ठिकाणी नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले.
सिंधू म्हणाली, ‘‘राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकामुळे माझ्या आशा उंचावल्या होता. पण पायाच्या दुखापतीमुळे मला जागतिक स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीपासूनच पायाला वेदना जाणवत होत्या. हैदराबादला परतल्यावर तातडीने चाचणी करून घेतली. त्यामध्ये डाव्या पायाची दुखापत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले.