
पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या (Mumbai) दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी अनेक सेवांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दावोसला जाणार नाहीत. आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय.
उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं! शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार
संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी एका दिवसासाठी आहेत. त्यांची तारीख देखील बदलता आली असती. मात्र यांना गुंतवणुकीपेक्षा पंतप्रधानांचे राजकीय कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. त्यांना शिवसेनेला त्रास देणं महत्त्वाचं आहे. त्यांना गुंतवणुकीचं काही पडलेल नाही.” अशी जोरदार टीका राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ गावात शेतीला बांधच नाहीत; सगळीकडे रंगलीय जोरदार चर्चा
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करा. ते पुढची तारीख देतील. मात्र नंतर दावोसची तारीख मिळणार नाही, नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा निव्वळ राजकीय असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित करण्यात आलाय”, असे म्हणत राऊतांनी खोचला टोला लगावलाय.
आमदार बच्चू कडूंचा अपघात की घातपात? राष्ट्रवादीच्या आमदाराने उपस्थित केला प्रश्न
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2 ए (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो 7 (Mumbai Metro 7) या मार्गिकेवरील सेवांचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या काही प्रकल्पांचे भूमीपूजन देखील करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
“गोपीचंद पडळकरांना चोपल्याशिवाय राहणार नाही” राष्ट्रवादीच्या ‘या’ महिलेचा गंभीर इशारा