
राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल सर्वच स्तरांतून आवाज उठवला जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एफआरपी दोन टप्प्यात विभागून देण्याच्या निर्णयामुळे सरकार वर टीका केली जातीये. अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी देखील पत्रकार परिषदेत सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
मोठी बातमी! ऊस बिले थकविणाऱ्या कारखान्याच्या संचालकांवर होणार गुन्हा दाखल; वाचा सविस्तर
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Kharip crop loss) झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही पाणी साचलेले आहे. परंतु, सरकार फक्त घोषणाच करण्यात व्यस्त आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केलाय.
चक्क कुत्र्याने केला बिबट्याचा सामना; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करणारे अधिकारी देखील शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत. अशावेळी सरकार नक्की काय करत असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
अब्दुल सत्तार यांच्याकडून शिवराळ भाषेत सुप्रिया सुळेंवर टीका; राष्ट्रवादी आक्रमक
राज्यसरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही कुठलाच निधी (Goverment fund) दिला नाहीये. यावर देखील अजित पवार पत्रकार परिषदेत बोलले आहेत. पिकांचे नुकसान झाल्याने आधीच शेतकऱ्यांच्या खिशात दमडी देखील नाही. अशातच पंचनाम्यासाठी आलेले अधिकारी देखील पैसे मागत असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.
दुग्धव्यवसाय तेजीत! पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’; जनावरांच्या किमतीत वाढ..