…तर सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे पद रद्द होणार; काय आहे कारण?

...then the post of sarpanch, member, gram sevak will be cancelled; What is the reason?

स्त्रीला अस म्हणतात की सह्याद्रीची कणखरता तू.. सृष्टीची या निर्माती तू.. अबला नाही सबला तू..दुष्प्रवृत्तीचा कर्दनकाळ तू..महिला ही सृष्टीची निर्माती आहे. तरीसुद्धा दुर्दैवाने बालविवाहासह (child marriage) इतर कारणांमुळे सहा ते आठ हजार गर्भवती मातांचा (expectant mothers) मृत्यू होतो. चिंतेची बाब म्हणजे, 2017-18 पासून पाच वर्षांत तब्बल 93 हजार बालमृत्यू (वयोगट 0 ते 5) झाले आहेत. देशात महाराष्ट्र (Mahatashtra) मातामृत्यूमध्ये दुसऱ्या क्रमांकावर (एक लाखामध्ये 70 हून अधिक मृत्यू) आहे.

धक्कादायक! नातेवाईकानीच चार वर्षांच्या मुलाची अपहरण करून केली हत्या

14 ते 16 वयाची असतानाच तिच्यावर संसाराची आणि मुलाबाळांची जबाबदारी येते. त्यामुळे मातेसह नवजात शिशूच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. दरम्यान मागील अडीच वर्षांत राज्यात जवळपास तीन हजार बालविवाह रोखले आहेत. त्यामुळे ही प्रथा कायमची बंद व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता ज्या गावात बालविवाह झाला किंवा होत आहे तेथील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे पद रद्द होणार असा प्रस्ताव राज्य महिला आयोगाने सरकारला पाठविला आहे. या प्रस्तावामुळे बालविवाहाला चाप बसेल, असा विश्वास आहे.

दारूच व्यसन आल अंगलट, 10 रुपये कमी पडले म्हणून पठ्ठ्यानं चक्क मालकासहित दुकानाच पेटवलं

बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार आता संबंधित मुला-मुलींचे पालक, भटजी, मंगल कार्यालय यांच्यावर कडक कारवाई होते. ही कारवाई होत असताना देखील बालविवाह कमी झालेले नाहीत. म्हणून आता या बालविवाह कायद्यातच दुरुस्ती होणार असून आता ज्या गावातील मुला-मुलींच्या बालविवाह होतील. तेथील सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांचे पद तत्काळ रद्द करावे किंवा तीन महिन्यांसाठी तरी रद्द होणार आहे.

आता दिवाळीत फटाक्यांचा ‘आवाज’ नियंत्रणात राहणार, वाचा सविस्तर

यामुळे बालविवाहाला चाप बसेल, असा प्रस्ताव सुदृढ समाजासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar ) यांनी सरकारला दिला. तसेच कायद्यातील दुरुस्तीनंतर निश्चितपणे ही अनिष्ट प्रथा हद्दपार होईल, असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.

हिरडगावमधील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी किल्ले धर्मवीरगड पूजन करून दीपोत्सव साजरा केला

बालविवाहामुळे बालमृत्यू प्रमाण वाढले – वर्ष बालमृत्यू

2017-18 20, 105 बालमृत्यू

2018 -19 20, 084 बालमृत्यू

2019 -20 19, 185 बालमृत्यू

2020 – 21 16 ,951बालमृत्यू

2021 -22 16 ,714 बालमृत्यू

एकूण 93,039 बालमृत्यू

बाबो! तब्बल १० कोटींचा म्हैस रेडा, ‘ही’ आहेत त्याची वैशिष्ट्ये

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *