
वाशी: वाशी येथे एका शेतकरी जोडप्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. या जोडप्याने आत्महत्या का केली याचे अद्याप कारण समजू शकलेले नाही.
सकाळी आठ वाजून गेले तरीही हे जोडपे घराबाहेर आले नव्हते. यावेळी काही ग्रामस्थानी घरी पाहाणी केली असता या जोडप्याने एकाच दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यांनतर पोलिसांनी त्यांचा तपास चालू केला. यांच्या मागे दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. एक मुलगी विवाहित असून दुसरी मुलगी बार्शी तर मुलगा परांडा येथे शिक्षण घेतायेत.
बापरे ! चक्क पाण्याची विहिरच गेली चोरीला, वाचा सविस्तर..
दरम्यान, गावात नवरात्रोत्सवानंतर ग्रामस्थ देवीची मूर्ती या जोडपायाच्या घरात ठेवतात. बऱ्याच दिवसांपासून ही परंपरा आहे. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त या जोडप्याने सर्व तयारी देखील करून ठेवली होती. पण महाप्रसादाऐवजी कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थांना दुखःद प्रसंगाला सामोर जावे लागल्याची भावना व्यक्त केली जात होती. या जोडप्याच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीचा लागला धक्का, शौचालयात नेऊन केला सामूहिक बलात्कार