
नाशिक: नाशिकमध्ये रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका लहान मुलासह 11 जणांचा मृत्यू झाला असून बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. पोलीस आणि अग्निशमन दलाने बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. नाशिक-औरंगाबाद (Nashik Accident) महामार्गावर पहाटे हा अपघात झाला. जखमींना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुवर्णसंधी! ‘या’ शेतकऱ्यांना जिंकता येणार 5 लाखांचे बक्षीस, असा करा अर्ज
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून जखमींचा उपचार शासनातर्फे केला जाणार असल्याची माहिती दिली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत या अपघाताची (Accident) चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
पुणे-सोलापूर मार्गावर श्रीगोंद्यातील स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात! एक जण जागीच ठार
नाशिकच्या नांदूर नाक्याजवळ खासगी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. जवळपास यात 35 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही खासगी बस होती यवतमाळहून मुंबईकडे जात असताना नाशिक येथील नांदूर नाक्याजवळील मिरची हॉटेल येथे हा भीषण अपघात झाला.
Devendra Fadanvis: राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार – देवेंद्र फडणवीस
हा अपघात पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान घडला असून या बसचा कंटेनरशी झालेला अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर बसला लगेच आग लागली. बसमधील प्रवाशी झोपलेले असल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही आणि त्यामुळे 8 ते 10 जणांचा मृत्यू झाला आहे.