
मुंबई : सोमवारी सकाळी अंबरनाथमध्ये स्कूल बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटल्याचा धक्कादायक प्रकार अंबरमध्ये (Ambernath) घडला आहे. अपघात झालेल्या या स्कूलमध्ये जवळपास 17 ते 18 विद्यार्थी होते. या अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांना धक्का बसला.
CNG आणि PNG च्या किमती 1 ऑक्टोबरपासून वाढणार? आतापर्यंतचा सर्वोच्च दर असणार
सूत्रांच्या माहितीनुसार, सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ येथील ग्रीन सिटी संकुलामध्ये हा अपघात घडलाय. स्कुल बस उलटल्यानंतर तेथील स्थानिकांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढले त्यामुळे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण या अपघाताने सगळीकडे खळबळ उडाली आहे. यामुळे स्कूल बसची वाहतूक करणाऱ्यांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. मुलांना शाळेमध्ये स्कुलबसमध्ये पाठवावं का नाही असा प्रश्न पालकांना पडलाय.
दसऱ्यापूर्वीच झेंडूचा भाव 70 रुपये किलोपर्यंत; आणखी भाव वाढण्याची शक्यता
चालकाच्या बेजबाबदारीमुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येतोय. यावेळी तेथील स्थानिक नागरिक आणि स्कूल बस चालकांमध्ये बाचाबाची देखील झाली. स्कुल बस चालकांवर विश्वास ठेऊन पालक आपली मुले शाळेत पाठवतात. पण या अपघाताने त्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.