
Nitesh Rane । चिपळूण : भाजप आमदार नितेश राणे आणि विरोधी पक्षांमध्ये सतत जुंपल्याचे पाहायला मिळते. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. सध्या नितेश राणे एका वेगळ्याच कारणावरून चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) नितेश राणेंवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. काय आहे यामागचं नेमकं कारण? जाणून घेऊयात सविस्तर माहिती. (Latest Marathi News)
नीतेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात (Muslim Community) एक वक्तव्य केले होते. त्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी पत्रकार परिषदेत “मुस्लिम समाजाविरोधात नितेश राणेंनी केलेले वक्तव्य अतिशय गंभीर आणि भयंकर आहे. त्यांचा हा समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आम्ही नीतेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. भाजपने (BJP) आणि नेत्यांनी त्यांना समज देऊन रोखावे, सरकारनेदेखील त्यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी केली आहे. (Nitesh Rane vs Ramesh Kadam)
पुढे ते म्हणाले की, “भाजप आणि सरकार त्यांना पाठीशी घालत त्यांच्या वक्तव्यांचे समर्थन करत आहे. मुस्लिम समाज आताच येथे आला नाही. अनेक वर्षांपासून हा समाज येथे शांततेत आणि एकोप्याने राहत आहे. विशेष म्हणजे अगदी हिंदूच्या सणामध्ये आनंदाने ते सहभागी होतात. कोकण आणि महाराष्ट्राला हिंदू-मुस्लिम ऐक्याची मोठी परंपरा आहे,” असे रमेश कदम यांनी स्पष्ट केले.