
Raj Thackeray । महाराष्ट्रामध्ये मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दुकानावर पाट्या लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. मात्र आता ती मुदत संपली आहे. 25 नोव्हेंबर 2023 रोजी ही मुदत संपली आहे. मात्र यानंतर देखील दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यात आल्या नाहीत. यामुळेच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
याच मुद्द्यावरून मनसेने नाशिकमध्ये आंदोलन केले आहे. नाशिक शहरातील दुकानावरील इंग्रजी पाट्यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळ फासल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. मराठी पाट्या लावल्या नाही तर तोंडाला काळ फासू अशी घोषणा देखील कार्यकर्त्यांनी यावेळी दिली आहे.
त्याचबरोबर मागच्या दोन दिवसापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी यावर बोलताना सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. आपलं सरकार फक्त हिंदुत्व आणि मराठी बद्दल तोंड वाजवत आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे आहोत असे ते सातत्याने म्हणत आहे. मात्र त्यांचे कोणते बाळासाहेबांचे विचार आहेत? अस राज ठाकरे म्हणाले आहेत.