
Ajit Pawar । मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले आहेत. मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यभर आंदोलन देखील सुरू आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन आरक्षणासाठी लढावे असे आव्हान देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम
जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला वेळ आल्याने त्यांनी काल आपल्याआंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली आहे. जर सरकारने येता 24 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर या उपोषणादरम्यान पाणी औषध काहीही घेणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. आता यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
बारामती या ठिकाणी बोलताना अजित पवार म्हणाले, मराठा समाजाला ओबीसी प्रवरगातून आरक्षण देता येणार नाही एकाच्या तोंडाचा घास काढून दुसऱ्याच्या तोंडात टाकता येणार नाही. असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केल आहे. आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही तुमच्याकडे काही पर्याय असतील किंवा याबाबत काही चर्चा करायची असेल तर आम्ही कधी पण तयार आहोत. मी ही मराठ्याच्या पोटी जन्माला आलोय असं अजित पवार म्हणाले आहेत.
Baramti Plane Accident । धक्कादायक बातमी! बारामतीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले; वैमानिक जखमी